राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956 ; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 267 उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्हा परिषदांचा आज निकाल लागणार आहे. तसेच बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांचेही निकाला आजच स्पष्ट होणार आहेत.